आपण जन्माला आल्यावर किंवा आपला मृत्यू झाल्यावर कोणी आनंदी असतं तर कोणाला दु:ख होतं. त्यावेळेस हे स्वतःला माहीत नसतं. याचा विचार करून त्रास करून घेऊ नये. कारण वेळ आल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतात.
दिवसभर आग ओकणारा सूर्य संध्याकाळी प्रसन्न वाटतो. माणसाचं ही तसंच आहे. आपला माणूस रागावला तर काही वेळ आपण शांत रहावं. आपण काहीही प्रतिक्रिया दिली नाही तर राग लवकर शांत होतो.