Saturday 30 December 2017

सकारात्मक चर्चा हीच खरी ताकद

आपण रोज ज्या व्यक्तीच्या सहवासात राहत असतो त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल पहील्या भेटीतच एक आदर (सकारात्मक किंवा नकारात्मक) तयार झालेला असतो.

जर एखादी चूकून चूक झाली असेल तर आयुष्याभर तीच चूक समोरच्या व्यक्तीच्या मनात घर करून राहते. आपल्या हजार चांगल्या कामासमोर ती एक छोटी चूक समोरच्या व्यक्तीच्या मनातून आपले स्थान नष्ट करून टाकते. आपण खरे सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. ती समोरची व्यक्ती आपल्याला टाळू लागते. या साऱ्या गोष्टीमुळे आपले श्रेय दुसराच कोणीतरी घेऊन जातो.

समोरच्या व्यक्तीचे एक कर्तव्य आहे की ज्याच्याकडून चूक झाली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याला विश्वासात घेऊन सकारात्मक चर्चा  करून नात्यातली दरी जी वाढत आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते. सकारात्मक चर्चेतून नात्यात पुन्हा गोडी येते.  दोघांच्याही मनात कोणत्याही शंकेला जागा राहत नाही.  ते दोघे एकत्र राहू / व्यवहार करू शकतील. यामुळे दोघांचाही फायदा आहे. विचारांची देवाणघेवाण होईल.

सकारात्मक चर्चा हीच खरी ताकद आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ डिसेंबर २०१७

Sunday 17 December 2017

काय आहे जीवनात

काय आहे जीवनात या
कधी नकोसं वाटत आहे,
इच्छा नसता जगण्याची
तरी माणूस जगत आहे !

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ डिसेंबर २०१७

पैसा फक्त पैसा

जन्मापासून मृत्यूपर्यंत
पैसाच मोठा ठरत आहे
प्रत्येक जण यालाच का?
देव मानून जगत आहे!

काळजी घ्यावी लागते
नाजूक नाती जपताना
जग नेहमी पाहत आहे
पैश्यामुळे नाती तुटताना

न्याय मिळत नाही लवकर
तो, चार भिंतीत जगत आहे
पैसात ताकद आहे मोठी
का, येथे कायदा मरत आहे?

पैसा चांगला की वाईट?
याचं उत्तर सापडत नाही
पण पैश्याशिवाय जगात
कुठे काहीच घडत नाही!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ डिसेंबर २०१७

Saturday 9 December 2017

वाचत रहा. आनंदी रहा.

जे आपल्याला वाचायची खुप इच्छा झाली आणि ते जर खुप प्रयत्न करून मिळाले (महत्वाचं म्हणजे योग्य ते मिळाल्यावर) तर तो आनंद फार वेगळाच असतो.

वाचा आणि आनंदी व्हा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ डिसेंबर २०१७

Saturday 2 December 2017

मात्रा मोजणे

मात्रा मोजणे:-

लघु अक्षर १ मात्रा (u)
गुरू अक्षर २ मात्रा , ( -)

लघु :-
          अ,इ,उ,क,ख,ग,घ......क्ष,ज्ञ,
पहिली वेलांटी व पहिला उकार असेल तर लघु, ऋ,ह्र  याच मालिकेतील जोडाक्षरे उदा. ष्य , प्त , ब्द, द्ध , र्णि,

गुरू :-
  आ, ई,ऊ,ए,ऐ,ओ,औ,अं,अ:,का,की,कू,के,कै,को,कौ,कं,क:,खा.......ज्ञा...., जोडाक्षराचा आघात ज्या लघुवर पडतो तो गुरू होतो

उदा. अक्षर मधील अ गुरू
        शब्द मधील श गुरु

कथा - संघर्ष

कथा - संघर्ष
    रोजच्याप्रमाणे अजय आणि अश्विनी सकाळी लवकर उठले. घरातल्या सर्व सामानांची रात्रीच बांधाबांधी झाली होती. त्यांनी ठरवलं होतं की आज कोणत्याही परिस्थितीत हे राहतं घर सोडायचं. याचं कारण एकच की घरातील वडीलधारी मंडळी बरोबर अश्विनीचे नेहमी वाद होत असतं. यामध्ये अजयला आपली बायको अश्विनी बरोबर की घरातील वडीलधारी मंडळी बरोबर याचा निर्णयच तो लावू शकला नाही. या घरातील भांडणामुळे अश्विनी च्या अंगाला मास राहीलं नाही. ती वरचेवर शरीराने बारीक होत चालली होती. झुरत चालली होती. अजयला हेच कळत नव्हतं की आपली बायको जे काही वागते ते बरोबर आहे की घरातील वडीलधारी मंडळी. त्याचं मन त्याला हेच सांगत होतं की या घरापासून थोडं दूर राहून पाहूया की काय घडतंय पुढे. असा विचार करून दोघांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. यांचा मुलगा तीन वर्षाचा आहे. त्याला नर्सरीत प्रवेश घेतला होता. त्याचं नुकसान होऊ नये म्हणून जवळच त्यांनी भाड्याची खोली पाहून ठेवली होती. यांनी कसलाच विचार केला नाही की आपल्याला कमी पगार आहे. किंवा आपलं घर चालेल की नाही. भाडं भरणं होईल की नाही. याचा काहीही विचार न करता त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. कारण परिस्थितीच तशी होती. लग्नात आहेर म्हणून आलेली दोन भांडी आणि कपडे याची रात्रीच बांधाबांधी झाली होती.
    अजयने मालवाहतूक वाहन ठरवले. वाहन दारात आल्यावर अजयच्या आई वडीलांना खुप आश्चर्य वाटले. कारण कोणाला काही खबर न लागता या दोघांनी इतका मोठा निर्णय कसा घेतला. सर्व सामान वाहनात भरून झाल्यावर वाहन निघताच अश्विनीची सासू वाहनाकडे आली आणि एकदम तुच्छ भाषेत (शिवीगाळ करत) अश्विनीशी बोलू लागली. अश्विनी याच रोजच्या सासूच्या भांडणाला खुप वैतागली होती. त्या क्षणी तिच्या मनात विचारांचे वादळ वाहू लागले. ती मनातच म्हणाली की हे तुझे शेवटचे बोलणे असेल. मी चालले आहे ते परत कधी न येण्यासाठी. भाडेतत्वावर जी खोली पाहीली होती त्याचे भाडे देण्यासाठी अश्विनीने गळ्यातील मंगळसुत्र गहाण ठेवले होते. आदल्या दिवशीच अजयने त्या खोलीत स्वयंपाक करण्याची व्यवस्था करून ठेवली होती. खोली फार लहान होती. सरकारी कर्मचारी इमारत होती. थोडेच दिवस येथे काढायचे आहे असे दोघांनी ठरवले.
    अश्विनीला पोलीस भरतीसाठी मैदानी खेळासाठी पत्र आले होते. सर्व सामान नवीन घरात तसेच ठेवून अजय आणि अश्विनीने तीन वर्षाच्या मुलाला घेऊन टॅक्सी पकडून ताबडतोब मैदान गाठले. तिघेही सकाळ पासून उपाशी होते. अश्विनी तशीच मैदानी परीक्षेसाठी हजर झाली. परीक्षा बराच वेळ चालणार होती. अजय आपल्या लहान मुलाला घेऊन गेटच्या बाहेर थांबला. अजय बरोबर बरेच जण होते. ऊन वाढत होतं. थोडीशी सावली पाहून अजय मुलाला घेऊन बसला. मुलाला खुप भुक लागली म्हणून मुलाच्या आवडीचा खाऊ मुलाला घेऊन दिला. तब्बल तीन तासानंतर अश्विनीची परीक्षा संपली. मैदानी परीक्षेत धावणी होती. त्यात ती पास झाली. दुसऱ्या दिवशी परत अजुन एक परीक्षा होती. दोघांनाही खुप भुक लागली होती. जवळच्या हाॅटेलमधून त्यांनी पोटाला आधार म्हणून थोडं खाऊन घेतलं. दोघेही आजचा दिवस कधी विसरणारे नव्हते कारण घर सोडल्यावर पहिल्याच दिवशी खुप त्रास सोसला आहे. दोघेही खुप थकले होते. संध्याकाळी घरी आल्यावर अश्विनीने फक्त  फोडणीचा भात केला. जेवण झाल्यावर पुढील आयुष्याचा विचार करत होते. दोघेही एकमेकांचे विचार समजून घेत होते वर आपलेही मत मांडत होते. या दोघांच्या घर सोडण्यामुळे अजयचे आई वडील व नातेवाईकांनी या दोघांशी बोलणे बंद केले व नाती तोडून टाकली. दुसऱ्या दिवशी अश्विनी पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी जाऊ शकली नाही कारण तिचे शरीर फार दुःखत होते. मैदानी परीक्षा ती पास झाली नसती.
    ज्या घरात दोघे भाड्याने राहत होते घर फार लहान होते. घरमालकाला चाळीस हजार रूपये दिले होते. नाईलाजाने त्यांना तेथे राहवे लागत होते. सहा महिन्यातच त्यांनी ती खोली सोडली व कमी भाडे असणारे व शहराच्या दुर असे घर पाहीले. त्यांचे कर्जावर कर्ज काढण्याची वेळ येऊ लागली. अजयला पगार फार कमी होता. नवीन घराच्या शेजारी एक लहान मुलांचे प्ले ग्रूप होते. मुलाला त्यांनी तेथे प्रवेश घेतला. घर शहरापासून फार लांब असल्यामुळे अजयला कामावर जाण्यास भयंकर त्रास होत होता. त्याला ते करावेच लागत होते. रेल्वेचा प्रवास, बसचा प्रवास त्याच्या मागे लागला. रेल्वे प्रवास त्याचे दोन-तीन वेळा प्राण जाता जाता वाचला. अजयने हे अश्विनीला कधीच सांगितले नाही. अश्विनीला स्वतःचे घर घ्यायचे होते. अश्विनीने तिच्या वडीलांकडून थोडे व नातेवाईकांकडून थोडे पैसे घेऊन स्वतःचे घर घेतले. नवीन घर त्यांनी शहराच्या बाहेर घेतले. हे कर्ज फेडण्यासाठी बॅंकेतून त्यांनी मोठे कर्ज काढले. व ज्यांचे पैसे घेतले होते ते परत केले व बँकेचा एकच हप्ता सुरू ठेवला. कर्जचा बोजा वाढतच होता. नवरा बायकोला याची काळजी फार वाटत होती. निसर्गाच्या सान्निध्यात असं हे घर होतं. सर्व सुरळीत सुरू होतं. कोणाचाही कसलाच दबाव नव्हता. मुलालाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला. अजयने ऑफिसमध्ये चांगले काम केल्यामुळे त्याचा चांगला पगार वाढला. अशी दोन वर्षे त्यांची सुखात गेली. अजयच्या घरच्यांनी बोलणं बंद केलं होतं. आता यांचा मुलगा पाच वर्षाचा झाला होता. दोघांनी दुसऱ्या मुलाबद्दल विचार केला. दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी डाॅक्टरांनी क्रीटीटल केस आहे असे सांगितले. मुल आडवे आले आहे असे डाॅक्टरांनी सांगितले.  अजयला व घरच्यांना खुप काळजी वाटू लागली. डाॅक्टरांना शेवटी यश आलं.  कळा आल्यापासून तब्बल सहा ते सात तासांनी बाळाचा जन्म झाला.  सर्वांना फार आनंद झाला. दुसरा मुलगा झाल्यापासून अजयचे नातेवाईक आता सर्व विसरून अजयला येऊन भेटू लागले. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे सर्वांनी मनातला राग काढून टाकला. सर्व सुखाने नांदू लागले. घरात सुख नांदू लागताच या सुखाला नजर लागेल असे काही घडू लागले. कधी आजारी न पडणारी अश्विनी आता  सारखी आजारी पडू लागली. सुखाची झुळूक लागते न लागते लगेच पुन्हा दुःखाचे वारे वाहू लागले होते. छोट्या छोट्या आजारातून अश्विनीला टीबी ची लागण झाली. पुन्हा खर्च वाढला. अजयच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच होता. पगार कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. टीबी झाल्यावर तब्बल एक महिनाभर अश्विनी रूग्णालयात होती. अश्विनीकडे रूग्णालयात थांबायला कोणी नव्हते म्हणून अजय महिनाभर कामाला गेला नाही.  महिनाभरानंतर डाॅक्टरांनी अश्विनी घरी जाण्याची परवानगी दिली व पथ्य पाळायला सांगितले. या आजारात अश्विनी शरीराने खुप दुबळी झाली आहे. हे पाहून अजयला फार काळजी वाटत होती. घरात आता दोन लहान मुलं होती खर्च वाढत होता. अश्विनीची तब्येत कधी सुधारत असे तर कधी ती आजारी पडत असे. औषधांबरोबर अजय अश्विनीला चांगले खाऊ घालण्यात कमी पडत नव्हता. औषधांबरोबर अजय अश्विनीला धीर देत त्याने तिला लवकर बरे केले. अश्विनी हळू हळू आजारातून सावरली. तिने व अजयने दोन्ही मुलांवर पुर्ण लक्ष देण्याचे ठरवले. लहान मुलगा तीन वर्षाचा झाल्यावर त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत छोट्या शिशू साठी प्रवेश मिळाला. चारही बाजूंनी खर्च वाढतच होता. यावर मात करत दोघांचे शिक्षण सुरू होते. स्वतःचं घर झालं, मुलं चांगल्या शाळेत शिकू लागली आणि अजयचा पगारही चांगला वाढला होता. अजयचे आणि अश्विनीचे नातेवाईक आता गर्वाने या दोघांची वाह वाह करू लागले. पैसा-पाणी वाढत होता. दुर झालेली सारेजण आता जवळ येऊ पहात होती. कोणाचा त्रास नको म्हणून अजयने शहरापासून फारच लांब घर घेतलं होतं. काही कार्यक्रम असेल तरच पाहूणे घरी येत असत. दूर असल्यामुळे सहज म्हणून कोणाला येणे जमत नव्हते.
    एके दिवशी नगरपालिकेचे कर्मचारी अचानक अजय अश्विनी राहतात त्या चाळीवर आली आणि संपुर्ण चाळीची पहाणी केली. पहाणी करत असताना चाळीतील रहिवाशांना हे कसली पहाणी करत आहे हे समजत नव्हतं. अधिकाऱ्यांच्या हातात ज्या जागेवर चाळी बांधल्या आहेत त्या जागेचा नकाशा होता. हळूहळू सर्व गोष्टी चाळकरांच्या लक्षात येऊ लागल्या. ही चाळ अनाधिकृत आहे असे कर्मचाऱ्यांनी चाळकऱ्यांना सांगितले. सर्वांना मोठा धक्काच बसला. पुन्हा एकदा सुखाला मागे सारत दुःखाने बाजी मारली होती. इतर संकटांपेक्षा हे सर्वात मोठं संकट होतं. बिल्डर कडून साऱ्यांची फसवणूक झाली हे आता साऱ्यांच्या लक्षात आलं. बिल्डर च्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल झाली. चाळी अधिकृत कशा करून घेला येईल. याची धावपळ सुरू झाली. याचे कारण हेच की पहाणी करून झाल्यावर चाळीला नोटीसा येणार होत्या व त्या जमीनदोस्त होणार होत्या. या मंत्र्याला भेट त्या मंत्र्याला भेट. याची मदत घे त्याची मदत घे. हे सारं चाळीत सर्वजण करत होते. सर्वांनी एक गट तयार केला व चाळी कशा वाचवता येईल याचा विचार सर्वजण एकत्र येऊन करू लागले.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ डिसेंबर २०१७