डोळ्यांना दिसणाऱ्या शत्रूशी बळाचा वापर करून, शक्कल लढवून विजय मिळवू शकतो पण जेव्हा न दिसणारा शत्रू (साथीचा रोग) बळावतो तेव्हा आपली मनस्थिती बळकट करायची असते. घर आणि समाजाचं सहकार्यही तेवढंच अपेक्षित असतं.
धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळताना सारे भेदभाव विसरून माणूस आनंदी असतो आणि इतरांनाही आनंद वाटतो. तोच माणूस इतर दिवशी आपले स्वभावातील रंग दाखवून इतरांना दुःखी करण्याचं काम करत असतो.