पांगळा झाला भारत देश
प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनी
प्रमुख पाहुणे असतात अधिकारी।।
तेच अधिकारी इतर दिवशी
भ्रष्टाचार करून भरतात तिजोरी।।१।।
पांगळा झाला भारत देश
व्यर्थ ठरले क्रांतीकारांचे बलिदान।।
दंगली, मारामरी आणतात घडवून
वरून म्हणतात मेरा भारत महान।।२।।
भ्रष्टाचारांच्या घशात येथे जातात
गरिबांसाठी राबवलेल्या कित्येक योजना।।
जनतेच्या भल्यासाठी दिलेला पैसा
कुठे जातो? काहीच समजेना।।३।।
होणार कशी प्रगती देशाची?
मोठा प्रश्न मनातच राहतो।।
श्रीमंत हे श्रीमंतच होतात
गरीब मात्र तसाच राहतो।।४।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ जानेवारी २०१६
No comments:
Post a Comment