Monday 5 December 2016

जगायचं की मरायचं?

जगायचं की मरायचं?

संवाद खुंटतोय हल्ली
वाढले अंतर नात्यातले।।
धावपळीचे जीवन जगता
हरवले सुर जगण्यातले।।१।।

हरवलंय माणूसपण ईथे
शोधूनही सापडत नाही।।
ठेवायचा विश्वास कोणावर
काहीही कळत नाही।२।।

उरलेच नाही आताशा
भान कुणाचे कोणाला।।
जगायचं की मरायचं?
उत्तर नाही या प्रश्नाला।।३।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ मार्च २०१६

No comments:

Post a Comment