दुसर्यांच्या दुःखाची जाणीव असणाऱ्या व्यक्ती कोणत्याही परिस्थिती स्वतः आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांना हे माहीत असतं की या जगात स्वतः पेक्षा जास्त दुःखी असणारे व्यक्तीही आपल्याच सभोवती असतात.
माणसाला जेव्हा रडावसं वाटतं पण अश्रू गळण्या अगोदर त्याला स्वतःच्या मर्यादा आठवतात तेव्हा समजावं की तो माणूस आतून सावरलेला असतो आणि तो अजून कणखर झालेला असतो.
कानाच्या दारातून शब्दाने प्रवेश करताच ते सुख किंवा दुःख घेऊन येतात. यातील कोणाला स्वीकारायचं आणि कोणाला बाहेर काढायचं हे ज्याला कळतं तोच माणूस खरा जागृत असतो.