Sunday, 29 September 2019

विचारांची गर्दी

घुसमट नको विचारांची
मनातलं सारं बोलून घे
घातक आहे विचार गर्दी
वाद आता मिटवून घे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ सप्टेंबर २०१९

मनात साचलेलं

मनात साचलेलं सारं काही
थांबवलं आहे सध्या लिहणं
शिकतो आहे आजकाल मी
तिच्या विचारांशिवाय जगणं

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ सप्टेंबर २०१९

Wednesday, 11 September 2019

शुन्य

शुन्य जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याला काहीच किंमत नसते. जर तो एखाद्या अंकाच्या शेवटी जाऊन बसतो तेव्हा शुन्याची व त्या अंकाची किंमत वाढते. माणसांनी देखील नेहमी शुन्यासारखं वागावं. माणसांनी माणसांच्या मागे खंबीरपणे उभं रहावं. त्यामुळे स्वतःबरोबर दुसऱ्याचीही किंमत वाढते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ सप्टेंबर २०१९

Monday, 2 September 2019

गणपती आगमन

यंदाही आगमन झाले बाप्पाचे।
यावे पाहण्यास रूप देखणे।।
वाट पाहतो आहे आम्ही तुमची।
स्वागतास उभे परिवार कोकणे।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ सप्टेंबर २०१९