झाडावरची फुलं झाडावर असताना फार सुंदर दिसतात. एकदा का ती झाडावरून गळून खाली पडली, की ती पायदळी तुडवली जातात. नातेसंबंधांचंही तसंच असतं. म्हणून माणसांनी नात्यांना घट्ट पकडून ठेवावं.
चोथा होईपर्यंत उसाचा रस काढला जातो, कारण शेवटच्या थेंबामध्येही त्याचा गोडवा टिकून असतो. माणसाचंही तसंच असतं — चांगल्या माणसांची गरज संपली की, त्यांची किंमत कमी होते.
"अजूनही आपण जिवंत आहोत!" याच जाणीवेतून कदाचित जन्मदिवस / वाढदिवस साजरा केला जात असावा. तसं पाहिलं तर सर्वांनाच माहीत आहे की आपला प्रवास मृत्यूच्या दिशेने सुरू असतो.
दोघांचं एकमेकांवर कितीही खरं प्रेम असलं तरी जगाला ते "लफडं" वाटतं! चांगलं काय आणि वाईट काय आहे? हे जगापेक्षा आपल्यालाच कळतं. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं.