खोटं बोलणारे भीती आणि दडपणाखाली जगत असतात. त्यांना खूप विचार करून वागावं लागतं. त्यांच्या हातून नकळत बऱ्याच चुका होण्याची शक्यता असते. खरं बोलणारे मात्र एकदम बिनधास्त जगतात. ते आपलं म्हणणं सहज बोलून मोकळे होतात.
लोकं आपल्याशी कसे वागतात याचा विचार करायचा नाही, कारण तो त्यांच्या संस्कारांचा भाग असतो. त्याच लोकांना आपण किती शांतपणे समजून उत्तर द्यायचं, हे आपल्या स्वभावात असलं पाहिजे.