एखाद्यासाठी राखून ठेवलेली चांगली गोष्ट ज्याची आहे त्याला वेळेअगोदर समजल्यावर 'गैरसमज' होतो आणि हजार प्रश्न ऐकावे लागतात. ती गोष्ट वेळेवर समजल्यास लक्षात राहणारा 'आनंदोत्सव' होतो.
चालताना पायात खडा अडकला की व्यवस्थित चालणे होत नाही. तो खडा बाजूला केल्यावर आपण न अडखळता चालायला लागतो, याचप्रमाणे मनाला टोचणारे विचार काढून फेकून दिल्यावर अस्वस्थता कमी होते.