Saturday, 9 December 2017

वाचत रहा. आनंदी रहा.

जे आपल्याला वाचायची खुप इच्छा झाली आणि ते जर खुप प्रयत्न करून मिळाले (महत्वाचं म्हणजे योग्य ते मिळाल्यावर) तर तो आनंद फार वेगळाच असतो.

वाचा आणि आनंदी व्हा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ डिसेंबर २०१७

Saturday, 2 December 2017

मात्रा मोजणे

मात्रा मोजणे:-

लघु अक्षर १ मात्रा (u)
गुरू अक्षर २ मात्रा , ( -)

लघु :-
          अ,इ,उ,क,ख,ग,घ......क्ष,ज्ञ,
पहिली वेलांटी व पहिला उकार असेल तर लघु, ऋ,ह्र  याच मालिकेतील जोडाक्षरे उदा. ष्य , प्त , ब्द, द्ध , र्णि,

गुरू :-
  आ, ई,ऊ,ए,ऐ,ओ,औ,अं,अ:,का,की,कू,के,कै,को,कौ,कं,क:,खा.......ज्ञा...., जोडाक्षराचा आघात ज्या लघुवर पडतो तो गुरू होतो

उदा. अक्षर मधील अ गुरू
        शब्द मधील श गुरु

कथा - संघर्ष

कथा - संघर्ष
    रोजच्याप्रमाणे अजय आणि अश्विनी सकाळी लवकर उठले. घरातल्या सर्व सामानांची रात्रीच बांधाबांधी झाली होती. त्यांनी ठरवलं होतं की आज कोणत्याही परिस्थितीत हे राहतं घर सोडायचं. याचं कारण एकच की घरातील वडीलधारी मंडळी बरोबर अश्विनीचे नेहमी वाद होत असतं. यामध्ये अजयला आपली बायको अश्विनी बरोबर की घरातील वडीलधारी मंडळी बरोबर याचा निर्णयच तो लावू शकला नाही. या घरातील भांडणामुळे अश्विनी च्या अंगाला मास राहीलं नाही. ती वरचेवर शरीराने बारीक होत चालली होती. झुरत चालली होती. अजयला हेच कळत नव्हतं की आपली बायको जे काही वागते ते बरोबर आहे की घरातील वडीलधारी मंडळी. त्याचं मन त्याला हेच सांगत होतं की या घरापासून थोडं दूर राहून पाहूया की काय घडतंय पुढे. असा विचार करून दोघांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. यांचा मुलगा तीन वर्षाचा आहे. त्याला नर्सरीत प्रवेश घेतला होता. त्याचं नुकसान होऊ नये म्हणून जवळच त्यांनी भाड्याची खोली पाहून ठेवली होती. यांनी कसलाच विचार केला नाही की आपल्याला कमी पगार आहे. किंवा आपलं घर चालेल की नाही. भाडं भरणं होईल की नाही. याचा काहीही विचार न करता त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. कारण परिस्थितीच तशी होती. लग्नात आहेर म्हणून आलेली दोन भांडी आणि कपडे याची रात्रीच बांधाबांधी झाली होती.
    अजयने मालवाहतूक वाहन ठरवले. वाहन दारात आल्यावर अजयच्या आई वडीलांना खुप आश्चर्य वाटले. कारण कोणाला काही खबर न लागता या दोघांनी इतका मोठा निर्णय कसा घेतला. सर्व सामान वाहनात भरून झाल्यावर वाहन निघताच अश्विनीची सासू वाहनाकडे आली आणि एकदम तुच्छ भाषेत (शिवीगाळ करत) अश्विनीशी बोलू लागली. अश्विनी याच रोजच्या सासूच्या भांडणाला खुप वैतागली होती. त्या क्षणी तिच्या मनात विचारांचे वादळ वाहू लागले. ती मनातच म्हणाली की हे तुझे शेवटचे बोलणे असेल. मी चालले आहे ते परत कधी न येण्यासाठी. भाडेतत्वावर जी खोली पाहीली होती त्याचे भाडे देण्यासाठी अश्विनीने गळ्यातील मंगळसुत्र गहाण ठेवले होते. आदल्या दिवशीच अजयने त्या खोलीत स्वयंपाक करण्याची व्यवस्था करून ठेवली होती. खोली फार लहान होती. सरकारी कर्मचारी इमारत होती. थोडेच दिवस येथे काढायचे आहे असे दोघांनी ठरवले.
    अश्विनीला पोलीस भरतीसाठी मैदानी खेळासाठी पत्र आले होते. सर्व सामान नवीन घरात तसेच ठेवून अजय आणि अश्विनीने तीन वर्षाच्या मुलाला घेऊन टॅक्सी पकडून ताबडतोब मैदान गाठले. तिघेही सकाळ पासून उपाशी होते. अश्विनी तशीच मैदानी परीक्षेसाठी हजर झाली. परीक्षा बराच वेळ चालणार होती. अजय आपल्या लहान मुलाला घेऊन गेटच्या बाहेर थांबला. अजय बरोबर बरेच जण होते. ऊन वाढत होतं. थोडीशी सावली पाहून अजय मुलाला घेऊन बसला. मुलाला खुप भुक लागली म्हणून मुलाच्या आवडीचा खाऊ मुलाला घेऊन दिला. तब्बल तीन तासानंतर अश्विनीची परीक्षा संपली. मैदानी परीक्षेत धावणी होती. त्यात ती पास झाली. दुसऱ्या दिवशी परत अजुन एक परीक्षा होती. दोघांनाही खुप भुक लागली होती. जवळच्या हाॅटेलमधून त्यांनी पोटाला आधार म्हणून थोडं खाऊन घेतलं. दोघेही आजचा दिवस कधी विसरणारे नव्हते कारण घर सोडल्यावर पहिल्याच दिवशी खुप त्रास सोसला आहे. दोघेही खुप थकले होते. संध्याकाळी घरी आल्यावर अश्विनीने फक्त  फोडणीचा भात केला. जेवण झाल्यावर पुढील आयुष्याचा विचार करत होते. दोघेही एकमेकांचे विचार समजून घेत होते वर आपलेही मत मांडत होते. या दोघांच्या घर सोडण्यामुळे अजयचे आई वडील व नातेवाईकांनी या दोघांशी बोलणे बंद केले व नाती तोडून टाकली. दुसऱ्या दिवशी अश्विनी पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी जाऊ शकली नाही कारण तिचे शरीर फार दुःखत होते. मैदानी परीक्षा ती पास झाली नसती.
    ज्या घरात दोघे भाड्याने राहत होते घर फार लहान होते. घरमालकाला चाळीस हजार रूपये दिले होते. नाईलाजाने त्यांना तेथे राहवे लागत होते. सहा महिन्यातच त्यांनी ती खोली सोडली व कमी भाडे असणारे व शहराच्या दुर असे घर पाहीले. त्यांचे कर्जावर कर्ज काढण्याची वेळ येऊ लागली. अजयला पगार फार कमी होता. नवीन घराच्या शेजारी एक लहान मुलांचे प्ले ग्रूप होते. मुलाला त्यांनी तेथे प्रवेश घेतला. घर शहरापासून फार लांब असल्यामुळे अजयला कामावर जाण्यास भयंकर त्रास होत होता. त्याला ते करावेच लागत होते. रेल्वेचा प्रवास, बसचा प्रवास त्याच्या मागे लागला. रेल्वे प्रवास त्याचे दोन-तीन वेळा प्राण जाता जाता वाचला. अजयने हे अश्विनीला कधीच सांगितले नाही. अश्विनीला स्वतःचे घर घ्यायचे होते. अश्विनीने तिच्या वडीलांकडून थोडे व नातेवाईकांकडून थोडे पैसे घेऊन स्वतःचे घर घेतले. नवीन घर त्यांनी शहराच्या बाहेर घेतले. हे कर्ज फेडण्यासाठी बॅंकेतून त्यांनी मोठे कर्ज काढले. व ज्यांचे पैसे घेतले होते ते परत केले व बँकेचा एकच हप्ता सुरू ठेवला. कर्जचा बोजा वाढतच होता. नवरा बायकोला याची काळजी फार वाटत होती. निसर्गाच्या सान्निध्यात असं हे घर होतं. सर्व सुरळीत सुरू होतं. कोणाचाही कसलाच दबाव नव्हता. मुलालाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला. अजयने ऑफिसमध्ये चांगले काम केल्यामुळे त्याचा चांगला पगार वाढला. अशी दोन वर्षे त्यांची सुखात गेली. अजयच्या घरच्यांनी बोलणं बंद केलं होतं. आता यांचा मुलगा पाच वर्षाचा झाला होता. दोघांनी दुसऱ्या मुलाबद्दल विचार केला. दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी डाॅक्टरांनी क्रीटीटल केस आहे असे सांगितले. मुल आडवे आले आहे असे डाॅक्टरांनी सांगितले.  अजयला व घरच्यांना खुप काळजी वाटू लागली. डाॅक्टरांना शेवटी यश आलं.  कळा आल्यापासून तब्बल सहा ते सात तासांनी बाळाचा जन्म झाला.  सर्वांना फार आनंद झाला. दुसरा मुलगा झाल्यापासून अजयचे नातेवाईक आता सर्व विसरून अजयला येऊन भेटू लागले. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे सर्वांनी मनातला राग काढून टाकला. सर्व सुखाने नांदू लागले. घरात सुख नांदू लागताच या सुखाला नजर लागेल असे काही घडू लागले. कधी आजारी न पडणारी अश्विनी आता  सारखी आजारी पडू लागली. सुखाची झुळूक लागते न लागते लगेच पुन्हा दुःखाचे वारे वाहू लागले होते. छोट्या छोट्या आजारातून अश्विनीला टीबी ची लागण झाली. पुन्हा खर्च वाढला. अजयच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच होता. पगार कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. टीबी झाल्यावर तब्बल एक महिनाभर अश्विनी रूग्णालयात होती. अश्विनीकडे रूग्णालयात थांबायला कोणी नव्हते म्हणून अजय महिनाभर कामाला गेला नाही.  महिनाभरानंतर डाॅक्टरांनी अश्विनी घरी जाण्याची परवानगी दिली व पथ्य पाळायला सांगितले. या आजारात अश्विनी शरीराने खुप दुबळी झाली आहे. हे पाहून अजयला फार काळजी वाटत होती. घरात आता दोन लहान मुलं होती खर्च वाढत होता. अश्विनीची तब्येत कधी सुधारत असे तर कधी ती आजारी पडत असे. औषधांबरोबर अजय अश्विनीला चांगले खाऊ घालण्यात कमी पडत नव्हता. औषधांबरोबर अजय अश्विनीला धीर देत त्याने तिला लवकर बरे केले. अश्विनी हळू हळू आजारातून सावरली. तिने व अजयने दोन्ही मुलांवर पुर्ण लक्ष देण्याचे ठरवले. लहान मुलगा तीन वर्षाचा झाल्यावर त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत छोट्या शिशू साठी प्रवेश मिळाला. चारही बाजूंनी खर्च वाढतच होता. यावर मात करत दोघांचे शिक्षण सुरू होते. स्वतःचं घर झालं, मुलं चांगल्या शाळेत शिकू लागली आणि अजयचा पगारही चांगला वाढला होता. अजयचे आणि अश्विनीचे नातेवाईक आता गर्वाने या दोघांची वाह वाह करू लागले. पैसा-पाणी वाढत होता. दुर झालेली सारेजण आता जवळ येऊ पहात होती. कोणाचा त्रास नको म्हणून अजयने शहरापासून फारच लांब घर घेतलं होतं. काही कार्यक्रम असेल तरच पाहूणे घरी येत असत. दूर असल्यामुळे सहज म्हणून कोणाला येणे जमत नव्हते.
    एके दिवशी नगरपालिकेचे कर्मचारी अचानक अजय अश्विनी राहतात त्या चाळीवर आली आणि संपुर्ण चाळीची पहाणी केली. पहाणी करत असताना चाळीतील रहिवाशांना हे कसली पहाणी करत आहे हे समजत नव्हतं. अधिकाऱ्यांच्या हातात ज्या जागेवर चाळी बांधल्या आहेत त्या जागेचा नकाशा होता. हळूहळू सर्व गोष्टी चाळकरांच्या लक्षात येऊ लागल्या. ही चाळ अनाधिकृत आहे असे कर्मचाऱ्यांनी चाळकऱ्यांना सांगितले. सर्वांना मोठा धक्काच बसला. पुन्हा एकदा सुखाला मागे सारत दुःखाने बाजी मारली होती. इतर संकटांपेक्षा हे सर्वात मोठं संकट होतं. बिल्डर कडून साऱ्यांची फसवणूक झाली हे आता साऱ्यांच्या लक्षात आलं. बिल्डर च्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल झाली. चाळी अधिकृत कशा करून घेला येईल. याची धावपळ सुरू झाली. याचे कारण हेच की पहाणी करून झाल्यावर चाळीला नोटीसा येणार होत्या व त्या जमीनदोस्त होणार होत्या. या मंत्र्याला भेट त्या मंत्र्याला भेट. याची मदत घे त्याची मदत घे. हे सारं चाळीत सर्वजण करत होते. सर्वांनी एक गट तयार केला व चाळी कशा वाचवता येईल याचा विचार सर्वजण एकत्र येऊन करू लागले.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ डिसेंबर २०१७

Wednesday, 29 November 2017

गझल

एक शेर

विश्वास फार होता ज्याच्यावरीच माझा
त्यानेच "हाय" केला पाठीत वार माझ्या

Sunday, 19 November 2017

....पत्र हरवलं

    पुर्वी आम्ही पोस्टमन काकाची खुपच वाट पाहत असे.  कारण, ताईच पत्र येणारं असतं. ताई आम्हाला आठवड्यातून दोनदा तरी पत्र लिहायची. आम्हीही तिला पत्राचे उत्तर लगेच पाठवत असे. पत्र वाचताना माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत असत कारण तो वेगळाच आनंद असायचा. ती एक माया, ममता होती. पत्रातील प्रत्येक अक्षरात ताईचा चेहरा दिसत असे. रात्रीचे जेवण व सर्व आवरून झाले की आम्ही सर्वजण एकत्र बसून पत्र लिहत असे. तो अनुभव फार वेगळाच होता. आई-पप्पा पत्राचा मजकूर सांगत असत व ते मी लिहायचं काम करायचो. खुप छान वाटायचं पत्र लिहताना. आम्ही तर पोस्ट ऑफिसमधून अंतरदेशीय पत्र व पोस्ट कार्ड खुप आणून ठेवायचो.

    आता ते सारे दिवस बदलले आहे. पोस्टमन काकांची क्वचितच भेट होते. त्यांच्या हातात पत्र असतात पण बहुतेक सरकारी कामकाजाची. आम्ही पुर्वी पत्र लिहायचो ते म्हणजे नाती जोडण्यासाठी आणि आता कोर्टाकडून पत्र (नोटीस) पोस्टमन काकाकडे आलेली असतात ते म्हणजे संसार मोडण्यासाठी. खुप अवघड परिस्थिती आहे. आजच्या काळात कोणीही दूरच्या नातेवाईकांना पत्र लिहिताना पाहीलं नाही. पत्र लिखाण फार कमी झालंय (पत्र लिखाण थांबलेच आहे असं म्हणायला हरकत नाही).  आजच्या काळात आठवण आली की सरळ फोन उचलतात आणि दोन शब्द बोलून मोकळे होतात. आजच्या टेक्नाॅलाॅजीच्या युगात नवेनवे स्मार्ट फोन येत आहेत. समोरच्या व्यक्तीला जरी मोबाईल वरून संदेश पाठवायचा असेल तर लिखाण कमी व चिन्हच (emoji) जास्त असतात. एवढं जग व्यस्त/कामात गुंतलेला असतो. या अशा काळात पत्र हरवलं आहे.

    आपण जे कधी प्रत्यक्ष बोलू शकत नाही ते पत्राच्यारूपात मत मांडल्यावर मनावरचं ओझं हलकं होतं. मुख्य म्हणजे आपल्या हातून काहीतरी लिखाण झालं आहे याचा आनंद आपल्याला मिळतो. चला मग थोडा वेळ काढून पत्र लिहूया. पहा किती धम्माल येईल.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ नोव्हेंबर २०१७

Friday, 17 November 2017

कादंबरी

संदर्भ: wikipedia

कादंबरी

साधारणत: अधिक लांबीचे काल्पनिक कथा असलेले गद्यलेखन यास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात ७व्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji ही पहिली कादंबरी ११व्या शतकात लिहिली गेली.

कादंबरी या साहित्य प्रकारचे स्वरूप

कादंबरी ह्या साहित्य प्रकाराला अभ्यासताना त्यासाठी असणार्या करार, काळ,आवाज या संकल्पनाही लक्षात घ्याव्या लागतात. डॉ. मिलिंद मालशे यांनी दिलेल्या साहित्याच्या पायाभूत करार या संकल्पनेनुसार ‘कथन करणे’ हा कादंबरीचा करार सांगितला जातो. म्हणजेच कथानात्मक या साहित्याच्या मुलभूत प्रवृत्तीत ‘कादंबरी’ हा प्रकार मोडतो. यातून कादंबरीकार त्याने अनुभवलेल्या जीवनाचे त्रयस्थपणे कथन करत असतो. म्हणून या प्रकाराला आत्मनिष्ठ म्हणता येत नाही. कादंबरीत येणाऱ्या या जीवनपट एका विशिष्ट काळाचे दर्शन घडवत असतो. कादंबरीत येणारा हा ‘काळ’ सुझन लँगरच्या ‘काळ’ यासंकल्पनेनुसार प्रतीभाषिक भूतकाळ असतो. कादंबरी ही कथनात्मक स्वरुपाची असल्याने कादंबरीकार त्यातील व्यक्तिरेखांविषयी सांगत अस्तोसतो. म्हणजे टी. रास इलियट च्या आवाजाच्या संकल्पनेनुसार कादंबरीचा ‘दुसरा आवाज’ असतो.

कादंबरी, लघुकादंबरी आणि दीर्घ कादंबरी

लघुकादंबरी म्हणजे कादंबरीच- फक्त लघू असे नाही. लघुकादंबरी ही तिच्या मुळापासूनच एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. १८७२ साली विनायक कोंडदेव ओक यांनी 'शिरस्तेदार' लिहिली तेव्हापासूनच मराठीत हिचा आरंभ झाला. व्यक्ती आणि समाज यांचे यथार्थ चित्रण असलेल्या लाचखाऊ मामलेदाराच्या या आत्मपरीक्षणात्मक कहाणीला तेव्हा छोटेखानी कादंबरी संबोधले गेले होते. केवळ आकाराच्या दृष्टीने हा छोटेपणा नसून यात एकूणच लघुत्व आहे, व ते पुढे कसेकसे विकसित होत गेले हे पाहणे महत्त्वाचे आहे. लघुकादंबरी लिहिण्यासाठी लघुकथा, दीर्घकथा आणि नेहमीची कादंबरी विचारात घ्यावी लागते.

कथा-दीर्घकथा, लघुकादंबरी-कादंबरी असे म्हणण्यानेच जाणकार वाचकाच्या मनात त्यांतील भेद लक्षात येतो. पण कधीकधी लेखकाचीच द्विधा मन:स्थिती होते.'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही ह.मो. मराठे यांची लघुकादंबरी १९६९ साली साधनाच्या दिवाळी अंकात दीर्घकथा म्हणून प्रसिद्ध झाली. तिला पुस्तकरूप देताना मात्र लेखकाने आणि प्रकाशकानेही कादंबरी म्हटले. 'काळा सूर्' या कमल देसाई यांच्या वाचकप्रिय लेखनाबाबतही असेच झले.

डॉ. स्वाती सु. कर्वे यांनी त्यांच्या 'लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप' या पुस्तकाच्या चौथ्या सूची विभागात गणपतराव शिरके, सद्गुणी स्त्री, ना.ह. आपटे यांच्यापासून ते हिदायतखान यांच्यापर्यंतच्या लघुकादंबऱ्यांची नामावली दिली आहे. इ.स. १९९६ ते २०१० या कालावधीतील महत्त्वाच्या लघुकादंबऱ्या, दीर्घकथा/कथांचीही यादी दिलेली आहे. प्रतीती ही सानिया यांची दीर्घकथा आहे, तर अवकाश ही त्यांचीच लघुकादंबरी आहे, डॉ. स्वाती सु. कर्वे. यांनी वामन मल्हार जोशी, विभावरी शिरूरकर, जयवंत दळवी, दिलीप पु. चित्रे, वसंत आबाजी डहाके अशा अनेकांच्या लेखनावरही सविस्तर लिहिले आहे.

जी कथात्म कलाकृती मानवी जीवनातील व्यक्तिगत पातळीवर अधिक विकास पावते किंवा एका सूत्राच्या मदतीने समूह जीवनाचे चित्रण करते; आपल्या मर्यादित विकासात एका स्वतंत्र जीवनांशाचे, संघर्षाने भान आणून देते; कादंबरीतंत्राने विकसित होऊन मर्यादित अवकाशात संपते ती लघुकादंबरी. वा जो अनुभव व्यक्तिगत पातळीवर अधिक रेंगाळत असतो किंवा एका सूत्रात समूह जीवनाचे, व मर्यादित परिघात एका संपूर्ण जीवनाचे चित्र उभे करीत असतो, असा कादंबरीतंत्राने विकसित होणारा कथात्म लेखनप्रकार म्हणजे लघुकादंबरी, असे स्वाती कर्वे लिहितात..

मराठी कादंबरीचा इतिहास

पहिली कादंबरी : यमुनापर्यटन (इ.स.१८५७), लेखक बाबा पदमनजी. ही आधुनिक भारतीय भाषांतलीही पहिली कादंबरी समजली जाते.

पहिली लघुकादंबरी : शिरस्तेदार (इ.स. १८८१), लेखक विनायक कोंडदेव ओक

पहिली सामाजिक कादंबरी : पण लक्षांत कोण घेतो (.इ.स. १८९३), लेखक हरी नारायण आपटे

प्रसिद्ध मराठी कादंबरीकार

अरुण साधू

प्रल्हाद केशव अत्रे

आनंद यादव

गंगाधर गाडगीळ

गौरी देशपांडे

चिं. त्र्यं. खानोलकर

चिं. वि. जोशी

जयंत नारळीकर

जयवंत दळवी

द. मा. मिरासदार

दया पवार

ना.सी. फडके

भालचंद्र नेमाडे

पु.भा. भावे

बाबा कदम

रणजित देसाई

लक्ष्मण माने

लक्ष्मण लोंढे

व. पु. काळे

वि. स. खांडेकर

श्री.ना.पेंडसे

सुहास शिरवळकर

केशव मेश्राम

बाबूराव बागूल

अण्णाभाऊ साठे

सुधाकर गायकवाड

शंकरराव खरात

रा.रं. बोराडे

नरेंद्र नाईक

व्यंकटेश माडगुळकर

प्रसिद्ध कादंबऱ्या

अमृतवेल (कादंबरी)

आनंदी गोपाळ

आमदार सौभाग्यवती

ऋतुचक्र

कुणा एकाची भ्रमणगाथा

कोसला

जरिला

झाडाझडती

झोपडपट्टी

झेप

तांबडफुटी

दुनियादारी

पाचोळा

पानिपत

पार्टनर

पोखरण

फकिरा

बनगरवाडी

बिधर

महानायक

मृत्युंजय

ययाति

रणांगण

राऊ

व्यासपर्व

शूद्र्

श्रीमानयोगी

संभाजी

सूड

स्वामी

ही वाट एकटीची

काळोखातील अग्निशिखा

Wednesday, 8 November 2017

कोर्टाची नोटीस

पुर्वी पोस्टमनच्या हातात नेहमी
पत्रे दिसायची नाते जोडणारी
आता दिसते कोर्टाची नोटीस
ती असते नात्यास दुभंगणारी

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ नोव्हेंबर २०१७