स्वतःहून आपल्या वाट्याला कोणीही येत नाही. पण जेव्हा आपला मीपणा आडवा येतो, तेव्हा आपल्याला खरं आणि खोटं यांची पारख करता येत नाही. मीपणा ज्याच्या अंगी असतो, त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. मीपणामुळे समाजात कितीही इज्जत कमी झाली तरी त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही, कारण मीपणामुळे तो विचार करण्याची शक्ती गमावून बसलेला असतो. मीपणा मिरवणारा माणूस जिवंत असला तरी तो समाजाच्या नजरेत कधीही येत नाही, कारण प्रत्येकजण त्याला नजरेआड करण्याचा प्रयत्न करत असतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०५ जानेवारी २०२६