आनंदकंद
नेत्यावरी भरोसा ठेवून आज आहे
त्यांच्यात का कळेना आजन्म माज आहे
गेलो झिजून पुरता, पर्वा कधी न केली
गोतावळा तरीही नाराज आज आहे
नाती कशी जपावी मोठाच प्रश्न आहे
शब्दात गोडवा हा याचा इलाज आहे
हासून पाहते ती घायाळ जीव होतो
भेटीत का सखीच्या डोळ्यात लाज आहे?
राखेत लीन झाला आत्मा जळून गेला
तू एकटा स्मशानी हा अंत आज आहे
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ नोव्हेंबर २०२४
No comments:
Post a Comment